उरमोडी धरण

पाणीपातळीत मोठी वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, आजपासून पाणी विसर्गाचा सुरुवात करण्यात येणार आहे. नदीकाठावरील नागरिकांना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, आजपासून पाणी विसर्गाचा सुरुवात करण्यात येणार आहे. नदीकाठावरील नागरिकांना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील पाणीपातळी

उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. जलसाठ्यामुळे आज, २४ जून २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून जलविद्युत प्रकल्पातून उरमोडी नदी पात्रात ५०० क्यूसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास, सांडव्यावरून देखील विसर्ग सोडण्यात येऊ शकतो. यामुळे नदीपात्राजवळील पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत धरणाच्या खालील भागातील ओढे आणि नाले यामधून येणारे पाणी, आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे उरमोडी नदी पात्रात पाण्याची पातळी वाढेल. यामुळे नदीपात्राजवळील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना नदीपात्रात जाण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे.

नदीकाठावरील गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी नदीपात्रात कोणत्याही कारणास्तव जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठावरील ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांना देखील ही बाब लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने सुरक्षितता उपाययोजना तपासण्याची आणि आवश्यक असल्यास स्थलांतराची योजना आखण्याची सूचना देण्यात आली आहे.

Review

Harshvardhan Pawar
Nov 10, 2024

Congratulations 🎉🎉

Reply